महाराष्ट्र
शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे 308 कोटी 21 लाख रुपये अनुदान वाटप करा – जगताप

धाराशिव : सन 2024 चे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे 308 कोटी 21 लाख रुपये अनुदान प्रस्तावास मंजुरी देऊन शेतकऱ्यांना तातडीने वाटप करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने, जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला 4 ऑक्टोबर रोजी परंडा, कळम, धाराशिव, वाशी या तालुक्याचा अनुदान प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे आग्रह धरल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्याचा 86 कोटी 46 लाख रुपये चा प्रस्ताव पाठवला होता मात्र त्या पुढील कालखंडात विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर सदरील प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही सध्या प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिव यांच्याकडे आहे. राज्यात सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळत नाही 2019 ला ही अशीच परिस्थिती उद्भवल्या नंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी त्या निधीला मान्यता देऊन अतिवृष्टी व सततच्या पावसाचे अनुदान दिले होते त्याच पद्धतीने याही वर्षी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 60 हजार 690 शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख 39 हजार 767 हेक्टर वरील नुकसानी पोटी 308 कोटी सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत.
तालुका वाईज शेतकरी संख्या व अनुदान मिळणारी रक्कम पुढील प्रमाणे.
धाराशिव तालुक्यातील 65633 शेतकऱ्यांना 48 कोटी 42 लाख रुपये अनुदान मिळणार आहे, परंडा तालुक्यातील 14 हजार 395 शेतकऱ्यांना नऊ कोटी 44 लाख रुपये अनुदान मिळणार आहे ,कळम तालुक्यातील 65331 शेतकऱ्यांना 73 कोटी 45 लाख रुपये अनुदान मिळणार आहे ,वाशी तालुक्यातील 35 हजार 57 शेतकऱ्यांना 22 कोटी 18 लाख अनुदान मिळणार आहे, उमरगा तालुक्यातील 49 हजार 228 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाख रुपये अनुदान मिळणार आहे, तर लोहारा तालुक्यातील 300692 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
सदरील अनुदान प्रस्ताव अस तातडीने मान्यता देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी केली आहे.