नागपूर – जनमत विरोधी असतानाही ईव्हीएममुळे हे सरकर निवडून आले. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी
ईव्हीएम सरकार विरोधात आक्रमक होत हातात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
मर्कडवाडी येथे ग्रामस्थांनी ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी केली, मात्र त्यांना विरोध करण्यात आला.
येणाऱ्या काळात बॅलेटवर निवडणूक घेतली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.