धाराशिव : उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघासाठी युवा नेते आनंद पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आनंद पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काल अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या सूचनेनुसार आज उमेदवारी अर्ज दाखल केला. असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. श्री आनंद पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून अतिशय अल्प कालावधी त्यांनी खूप मोठी कामे केली. असून जनसामान्यांच्या अडचणीसाठी धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे विशेषता त्यांची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे.
त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदार संघातील तरुणासह वडीलधारी मंडळींनी देखील समाधान व्यक्त गरज आशीर्वाद देत ताकतीने निवडणूक लढवा अशा प्रेमाच्या सूचना केल्या आहेत. आनंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज कोणाचे गणित बिघडवणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.