धाराशिव

उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 86 कोटींच्या अतिवृष्टी अनुदानाची प्रतीक्षा; 29 एप्रिल रोजी धरणे आंदोलन

लोहारा | उमरगा :- प्रतिनिधी

उमरगा लोहारा तालुक्यातील प्रलंबित अतिवृष्टी अनुदान 86 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी 29 एप्रिल रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली आहे.

सन 2024 मध्ये लोहारा ,उमरगा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला 8 ऑक्टोबर रोजी धाराशिव, कळम ,परंडा व वाशी या चार तालुक्यातील एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांचा 221 कोटी 81 लाख रुपये अतिवृष्टी मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता तो मंजूर होऊन त्याचे बऱ्यापैकी वितरणही झाले आहे. लोहारा उमरगा तालुक्यात उशिराने पाऊस झाल्याने लोहारा उमरगा तालुक्यातील महसूल व कृषी विभागाकडून आलेल्या नुकसानीच्या प्रस्तावानंतर जिल्हा प्रशासनाने 15 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाकडे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला.

 

लोहारा तालुक्यातील 24 हजार 780 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाख तर उमरगा तालुक्यातील. 49228 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाख मिळणार आहे. याचा अर्थ लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 886 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपये मिळणार आहेत.

15 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून 27 ऑक्टोबरला महसूल व मदत पुनर्वसन खाते मंत्रालय येथे सदरील प्रस्ताव पाठविला असून आत्तापर्यंत मंजुरी अभावी सदरील प्रस्ताव मंत्रालयामध्ये प्रस्ताव प्रलंबित आहे.

राज्य शासनाने 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मात्र त्यात लोहारा उमरगा तालुक्यातील अतिवृष्टी प्रस्तावाचा समावेश नाही जानेवारी मध्ये देखील ज्यांनी प्रस्ताव दाखल केले त्यांचे देखील प्रस्ताव मंजूर झालेले आहेत मात्र 15 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला अद्याप पर्यंत मंत्रालयातून मंजुरी मिळालेली नाही.

शासनाचे लक्ष वेधून घेऊन लोहारा ,उमरगा तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना आर्थिक मिलाद दिलासा मिळण्यासाठी 29 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते एक या दरम्यान लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि जगताप यांनी दिली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आमचे पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

 

उमरगा लोहारा तालुक्यात उशिराने पाऊस झाला हे खरे आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने जिल्हा प्रशासनाने 15 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला मात्र त्याला अद्याप मंजुरी नाही इतर जिल्ह्यातील अगदी जानेवारी महिन्यात पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे मात्र लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव अगोदर जाऊन देखील त्याला मंजुरी मिळाली नाही या संदर्भात मंत्रालयात पाठपुरावा करूनही काही हालचाल होत नाही हा एक प्रकारे लोहारा आणि उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय आहे त्यामुळे आंदोलनाचे हत्यार उपसले आह. मागणी मान्य न झाल्यास पुढील कालखंडात आंदोलन आणखी तीव्र करू मात्र लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपये चे अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करून मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
अनिल जगताप
‌ सामाजिक कार्यकर्त.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!