धाराशिवमहाराष्ट्र
उमरगा : जनसुरक्षा कायदा रद्द करा – महाविकास आघाडी आक्रमक!

उमरगा (दि. १० सप्टेंबर २०२५) :
महाराष्ट्र शासनाने नुकताच मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज उमरगा येथे महाविकास आघाडी आक्रमक झाली. आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत या कायद्याला जोरदार विरोध दर्शविला.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की –
➡️ हा कायदा लोकशाही मूल्ये व संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणणारा आहे.
➡️ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा, मोर्चा आणि आंदोलन यांवर थेट बंधने येण्याची शक्यता.
➡️ शासनाविरोधात आवाज उठवणाऱ्या निष्पाप नागरिकांवर कारवाईचा धोका.
➡️ त्यामुळे लोकशाही व्यवस्थेलाच गंभीर धोका निर्माण होईल.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाम इशारा दिला की –
“लोकशाही तत्त्वांचे रक्षण आणि जनहित लक्षात घेता हा कायदा तातडीने रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल.”



