धाराशिवमहाराष्ट्रराजकीय

“धरण भरलं, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत – अनिल जगतापांची सिंहगर्जना : ‘जमीन संपादित करू देणार नाही’”

लोहारा : खेड (ता. लोहारा) येथे शेतकऱ्यांची मोठी सभा पार पडली. मंचावरून अनिल जगतापांनी जाहीर इशारा दिला – “धरणाची उंची वाढवण्यासाठी एक इंचही जमीन सरकार घेणार नाही, शेतकरी देणार नाही.”

1989 मध्ये निर्माण झालेल्या निम्न तेरणा प्रकल्पाची क्षमता गाळ साचल्याने 121 वरून 85 दशलक्ष घनमीटर इतकीच उरली आहे. तरीदेखील शासनाने 22 ऑगस्ट रोजी 190 कोटींच्या बेलकुंड उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली. आधीच लोहारा, उमरगा, औसा तालुक्यांचा पाणीपुरवठा व लोकमंगल कारखान्याचे आरक्षण या धरणावर आहे. परिणामी एकूण मागणी 140 दशलक्ष घनमीटरवर पोहोचली आहे, पण क्षमता फक्त 85 आहे.

 

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी धरणाची उंची वाढवावी लागणार असून यासाठी शेतकऱ्यांची उर्वरित जमीन संपादित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. “आधीच 75% जमीन दिली आहे, आता उरलेली 25%ही हिरावली तर शेतकरी भूमिहीन होतील,” असा संताप व्यक्त करण्यात आला.

अनिल जगतापांनी स्पष्ट इशारा दिला की, “सत्तेच्या जोरावर योजना रेटली तर जनआंदोलन आणि न्यायालयीन लढाही उभा राहील.” सभेला खेड व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!