लोहारा प्रतिनिधी : शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकऱ्यांच्या धान्याला कवडीमोल किंमत असल्याने शेतकरी हातबल झाला आहे त्यात बँकेचा तगादा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे यासाठी तात्काळ शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे यासाठी दिनांक
११/०४/२०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा सदस्यांच्या घरासमोर रात्री १२.०० वा. प्रहार जनशक्ती पक्ष धाराशिवच्या वतीने हातात मशाल घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन लोहारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी संपूर्ण राज्यभर (२८८ आमदारांच्या) घरासमोर दि.११/०४/२०२५ रोजी रात्री १२.०० वा. आंदोलन असल्यामुळे त्यांचा भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील ०४ आमदारांनी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी मुख्यमंत्री महोदयाकडे मांडावी यासाठी सर्व आमदाराच्या घरासमोर शांततेत हातात मशाल घेऊन गळयात निळा गमजा व भगवा झेंडा घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड तालुका अध्यक्ष वामन ढोणे शहराध्यक्ष महंमद सुंबेकर सह आदींच्या स्वाक्षऱ्यां आहेत.
Back to top button
error: Content is protected !!