पीक विमा कंपनी विरुद्ध आरआरसी कारवाईचा आग्रह धरणार – अनिल जगताप

धाराशिव : खरीप 2022 मधील उर्वरित पन्नास टक्के अर्थात 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने आनंद होत आहे मात्र आदेशाची अर्धीच अंमलबजावणी होत असून पंचनामाच्या प्रति व बाद केलेल्या एक लाख 45 हजार पूर्वसूचनाच्या फेर सर्वेक्षणासाठी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय कृषी पीक विमा कंपनी विरुद्ध आर आर सी कारवाईचा आग्रह धरणार ..खरीप 2022 याचिका करते अनिल जगताप यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती.

सन 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख 68 हजार 453 अर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला होता. अतिवृष्टी ,सततचा पाऊस झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिल्या जिल्ह्यातील पाच लाख 89 हजार 226 शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिल्या होत्या त्यापैकी एक लाख पंचेचाळीस हजार पूर्व सूचना बाद केल्या मात्र सोयाबीन पिकासाठी आलेल्या दोन लाख 63 हजार 656 पूर्व सूचना काढणी कालावधीच्या पंधरा दिवसाच्या पूर्वी म्हणजे 15 ऑक्टोबर पूर्वी प्राप्त झाल्या असल्याने त्यांना केंद्रीय मार्गदर्शक सूचनातील २१.५.१० चा मुद्दा लागू होत नव्हता मात्र भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने केवळ 50 टक्के रक्कम वाटप केली गेली याविरुद्ध शेतकरी अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय विभाग अपील दाखल केले दोन्ही निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागले मात्र कंपनी प्रतिसाद देत नव्हती.
त्यानंतर अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली 30 ऑगस्ट 2023 रोजी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने 294 कोटी रक्कम पंचनामेच्या प्रति व बाद केलेल्या एक लाख पंचेचाळीस हजार पुरुष सूचनाच्या फेरस सर्वेक्षणाचे आदेश दिले ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पार पाडावी असेही कंपनीला आदेशित केले गेले होते तीन महिन्याचा कालावधी लोटून ही कंपनी पैसे देत नव्हती म्हणून शेवटी याचिका करते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरला जिल्हाधिकाऱ्यांनी रीतसर तीन नोटीसा दिल्या मात्र कंपनीने कसलाच प्रतिसाद दिला नाही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी आर आर सी ची कारवाई करत कंपनीचे खाते सीज करून प्रॉपर्टी अटॅच केली.
कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून 25 जानेवारीपर्यंत पैसे दिल्याचे मान्य केले मात्र तत्पूर्वीच काल पैसे बँकेकडे जमा केले व ती शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पडत आहे याचा मनातून आनंद वाटत आहे.

पंचनामेच्या प्रती व बाद पूर्व सूचनाबाबत पुन्हा जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे कंपनीविरुद्ध आर आर सी कारवाई बाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे आग्रह धरणार.

पिक विमा कंपनीने सर्व पंचनामे डुप्लिकेट तयार केले असून तक्रार निवारण समितीच्या बैठकीत कृषी अधीक्षक यांनी माहिती अधिकारात ज्या शेतकऱ्यांनी प्रति उपलब्ध करून घेतले आहे त्यावर कृषी सहाय्यक यांची डुप्लिकेट स्वाक्षरी असल्याचे स्पष्ट पणाने सांगितले आहे तसेच शेतकऱ्याच्या हातात पंचनामाच्या प्रति पडल्यावर धक्का बसत आहे सर्व माहिती पुन्हा भरलेली आहे खऱ्या व योग्य पंचनामाच्या प्रति हातात आल्यानंतर शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही जवळपास 700 कोटी इतकी असणार आहे तसेच बाद केलेल्या एक लाख पंचेचाळीस हजार पूर्व सूचना फेर सर्वेक्षण केल्यानंतर आकडा खूप मोठा होणार आहे तसेच गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार ते वीस शेतकऱ्यांना केवळ 1000 पेक्षा कमी रक्कम उपलब्ध झालेली आहे यासाठी देखील आदेश झालेले असताना कंपनीने केवळ रक्कम दिली आहे आदेशाची अर्धवट अंमलबजावणी केलेली आहे म्हणून पुन्हा मंगळवारी जिल्हाधिकारी यांना भेटून कंपनीविरुद्ध पुन्हा आरआरसी कारवाई करण्याबाबत आग्रह धरणार असल्याचे श्री जगताप यांनी नमूद केले आहे.

 

खरीप 2022 मधील उर्वरित रकमेसाठी 294 कोटी रुपये वाटप होणार आहेत याचा मनातून आनंद आहे मात्र पंचनामाच्या प्रति व बाद पूर्व सूचनाबाबत अंमलबजावणी होत नाही त्यासंदर्भात कंपनीविरुद्ध पुन्हा आरआरसी कारवाई करणे बाबत मंगळवारी जिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटून विनंती करणार आहे.
अनिल जगताप खरीप 2022 पिक विमा याचिकाकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!