लग्न समारंभ आटोपून गावी परतत असताना भीषण अपघात अपघातात कुटुंबातील 4 जण ठार

किल्लारी (जि.लातुर ) :- प्रशांत नेटके

लग्न समारंभ आटोपून गावी परतत असताना भीषण अपघात अपघातात कुटुंबातील 4 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर- गुलबर्गा महामार्गावर औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ अपघात घडला आहे.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात खळबळ माजली आहे.


आज सकाळी निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे लग्न समारंभ आटोपून पुण्याहून निलंग्याला निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाखाली पलटी झाली. यामध्ये अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.


अपघातात गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!