भारत जोडो याञेत माजी केंद्रिय गृहमंञी शिवराज पाटील सहभागी

नांदेड : काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून भारत जोडो याञा निघाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात मार्गस्थ झाली आज बुधवारी शंकरनगर ते नायगाव, नांदेड दरम्यान माजी केंद्रिय गृहमंञी शिवराज पाटील चाकुरकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे सहभागी झाले आहेत.
यावेळी कॉग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले,खा.रजनीताई पाटील, नायगाव ,नांदेड ,परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्हातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.