“३९ वर्षा नंतर वर्ग मित्र मैत्रीणी आपल्या शाळेत भेटले…”

लोहारा : लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील आष्टा हायस्कूल या शाळेतील सन १९८३ च्या १० वी च्या वर्गातील ५५ विद्यार्थी वर्ग मित्र मैत्रीणी हे ३९ वर्षा नंतर रविवारी दि.३० आक्टोबर २०२२ रोजी आपल्या शाळेत एकत्र येऊन स्नेहसंमेन साजरे केले.
मौ. आष्टा कासार येथे पार पाडलेल्या या हृद्य कार्यक्रमाचे नियोजन या बॅच च्या माजी विद्यार्थ्यानीच केले होते.. एकूण ६६ विद्यार्थ्या पैकी ५५ विद्यार्थि त्यात १३ मुली (त्यांच्या नातवंडाबरोबर) व १२ शिक्षक, कर्मचारी ( सर्व सेवानिवृत्त) संस्थाचालक व गावातील मान्यवर इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. शिवशंकर स्वामी गुरुजी होते.
दिप प्रज्वलन करून व दिवंगत शिक्षक, विद्यार्थि, कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली… सुरुवातीला राष्ट्रगीत व प्रार्थना झाली,त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अड. सयाजी शिंदे यांनी केले. त्यानंतर अड. विरसंगप्पा अलंगे, अधीक्षक अभियंता श्री. अजित मदने, डॉ. सुवर्णा पोतदार, सौ. गंगुबाई स्वामी, बाबुराव सोमवंशी, गुंडू सोमवंशी, अनिल चिलोबा, सौ. जगदेवी पाटील, सौ. कालिका स्वामी, सौ. बबिता दलिंबकर, सौ. वैजयंती माळी, माजी सरपंच पंडित कागे, ई. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मुक्तपणे मांडले. त्यात शाळेत शिकलेल्या संस्कारचा उपयोग बाहेरच्या जीवनात कसा झाला याचे अनेक किस्से व्यक्त केले व आपल्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांनतर निवृत्त शिक्षक श्री. विष्णू सगर गुरुजी, फुंदिपल्ले गुरुजी, श्री. एल. एन. पाटील गुरुजी ई. आशीर्वाद पर मार्गदर्शन करताना या विद्यार्थ्यांच्या अनेक आठवणी सांगून कौतुक केले, अध्यक्ष श्री. स्वामी गुरुजी यांनी अध्यक्षीय समारोप करताना अनेक आठवणी सांगून या विद्यार्थ्यांनी बाहेरच्या जगात कमावलेले मान सन्मान, भूषवली पदे, आपल्या क्षेत्रात केलेली प्रगती ई. चा उल्लेख करून कौतुक केले व शाळेसाठी काहीतरी करण्याच्या धडपडीचे अभिनंदन केले…
जेवणानंतर या परीवरातीलच युवा गायक श्री. सुजित माने याचे गायन व कौतुक झाले, त्याला तबलासाथ नरसिंग पांचाळ, हर्मोईयम वर सुनिल माने यांनी दिली . त्यानंतर मुलांनी उपस्थित मुलींसाठी माहेरची साडी व मुलींनी मुलांना भेटवस्तू दिल्या, शेवटी सुनिल माने यांनी आभार प्रदर्शन केले.. अत्यंत खेळीमेळीच्या व भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली… या कार्यक्रमाला विद्यार्थि वर्ग मित्र मैत्रीणी खूप दुर दूर वरून देशातील विविध शहरातून व काहीजण परदेशातून आलेले होते. व गावातील नागरिक, नातेवाईक ई. बहुसंख्येने उपस्थित होते… कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. आलंगे, ॲड. सयाजी शिंदे, दिलीप चौधरी, दिगु दाशिमे, मकबूल शेख, गुंडू सोमवंशी, डॉ. सुवर्णा पोतदार, प्रविण चौधरी, गंगाधर बलसुरे, सौ.सविता सगर (मा. नगरसेविका अंबाजोगाई) व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.. व भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द गायक व संगीतकार श्रीराम पोतदार यांनी केले.