सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस); एकात्मिक व्यवस्थापना सल्ला

 

यावर्षी अनेक ठिकाणी वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस त्यानंतर पावसाने उघदिप दिली पडून त्यान आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरणाने जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्याने सोयाचीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे पांढरे पडत आहे. लोह (फेरस) या सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेने सोयाबीनच्या झाडामध्ये ‘फ्लोरोसिस’ लक्षणे निर्माण होतात, क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस ही जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेने होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न फेल्याने होते, अशी माहिती देत त्याचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचा साहा दिला आहे.

लोह (फेरस) वा सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावाने पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात. कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे वर्शविली जातात. पाने पिवळी पडल्याने हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते. लोहची कमतरता विशेषतः कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते, बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सुक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, अनेकदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक येत स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो. पाण्याचा ताण पडल्यास तुषारच्या साह्याने संरक्षित पाणी द्यावे. ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वापसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ब्रेड-२, ५० ग्रॅम किवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास ८-१० दिवसांनी परत एकया फवारणी करावी,

शिवाजी तारळकर मंडळ कृषी अधिकारी सास्तुर तालुका लोहारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!