दिवंगत पत्नीच्या स्त्रीधनातून स्मृती राहावी म्हणून एक लाख रुपये विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्या विकास प्रतिष्ठानला जाहीर

सुधीर कोरे                                                                           जेवळी ( ता. लोहारा, जि.धाराशिव )

जेवळी (ता. लोहारा) येथील निवृत्त शिक्षणाधिकारी बी. पी. माळी यांनी दिवंगत पत्नीचे स्त्रीधन त्यांच्या इच्छेप्रमाणे नातीच्या हाती सुपूर्त केला असता सर्व कुटुंबाने आजीची स्मृती राहावी यासाठी यातून
एक लाख रुपयांची मदत गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्या विकास प्रतिष्ठानला जाहीर केला आहे. या रक्कमेच्या व्याजातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा संकल्प आहे. माळी कुटुंबीयांनी राबवलेल्या या स्त्युत उपक्रमाचा परिसरात कौतुक होत आहे.

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असलेले बाबुराव पिराजी माळी. (बी.पी. माळी) हे निवृत्त शिक्षणाधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी लेखन छंद जोपासली असून आतापर्यंत विविध विषयावर त्यांची तेरा पुस्तके प्रकाशित झाले आहेत. या पैकी दोन पुस्तकाचे हिंदी अनुवाद झाले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोहारा येथील हायस्कूल लोहारा या खाजगी माध्यमिक शाळेत शिक्षकांची नोकरी केली आहे. १९८७ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपशिक्षणाधिकारी पदाच्या दर्जाची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे काही वर्षात पुन्हा महाराष्ट्र लोकसेवे वर्ग एक या परीक्षेत उत्तीर्ण होत शिक्षणाधिकारी पदावर रुजू झाले. २००६ ला ते निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तीन वर्ष शासकीय सेवेत काम केले आहे. २०१६ ला त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यानंतर त्यांनी आपली लक्ष लेखनाकडे वळवली. २०१७ ला शिक्षक म्हणून काम केलेल्या हायस्कूल लोहारा येथे माजी विद्यार्थी व सहकारी शिक्षकांचा स्नेह मेळावा लातूर येथे आयोजित केला. त्यामध्ये उपस्थितांनी विद्यार्थ्यांसाठी काम करणारे आपली एक धर्मदाय संस्था असावी अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे माजी विद्यार्थी व शिक्षकाने मिळून १०१८ ला विद्या विकास प्रतिष्ठान लातूर या नावाने संस्था स्थापित केली आहे. ही संस्था गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असून उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील गरजू, गरीब, निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत आहे. सध्या एकूण सहा विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, शिक्षणविषयक कामात होणाऱ्या खर्चाचा जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. २०२३ ला विद्या विकास प्रतिष्ठान धाराशी जिल्ह्यातील सुंबा या गावातील स्नेहा मुळे या मुलीची ७५ हजार रक्कम फी पोटी भरून तिचे शिक्षण चालू ठेवण्यास मदत केले आहे. संस्थेचा पसारा हळूहळू वाढत असून बी.पी माळी यांनी यापूर्वी आपल्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हार – तुरे भेटवस्तू या ऐवजी विद्या विकास प्रतिष्ठान साठी आर्थिक मदतीची आव्हान केल्याप्रमाणे मित्र, हितचिंतक व माळी परिवाराकडून एकत्रित एक लाख रुपयाचा निधी जमा झाला आहे.

यावर्षीच्या दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी निवृत्त शिक्षणाधिकारी बी.पी माळी यांच्या दिवंगत पत्नी कै. मंगल यांचे स्त्रीधन त्यांच्या इच्छेप्रमाणे तीन नातीच्या हाती सुपूर्त करण्यात आले परंतु सर्व कुटुंबाने आजीची आठवण राहावी यासाठी विद्या विकास प्रतिष्ठानला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केले आहे. या एक लाख रुपयाच्या व्याजाच्या रकमेतून गरीब, गरजू, दत्तक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च, वैयक्तिक खर्च भागवला जावा अशी अपेक्षा आहे. या समाज उपयोगी उपक्रमातून माळी परिवाराने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ही विं. दा. करंदीकरांची कवितेचा संदेश माझ्या मुलाने, मुलीने व सुनानी प्रत्यक्षात आपल्या आचरणात आणून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे त्यांचे मनापासून कौतुक व प्रतिष्ठाना तर्फे आभार

बी. पी. माळी, निवृत्त शिक्षणाधिकारी, जेवळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!