प्रस्तावित कायद्याविरोधात कृषी निविष्ठा विक्रेते आक्रमक

लोहारा ( जि.धाराशिव ) : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रस्तावित विधेयकातील पाच विधेयकांमध्ये जाचक अटीचा समावेश केल्याचे मत कृषी निविष्ठा विक्रत्याचे वतीने व्यक्त केले जात आहे.सदरील पाच विधयके रद्द करण्याची मागणी मान्य न केल्यास येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान तिन दिवस बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला.यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी तरळकर साहेब व तहसीलदार लोहारा यांना निवेदन देन्यात आले.यावेळी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष दीपक भैय्या जवळगे,उपाध्यक्ष नेताजी ओवंडकर, शुभम रसाळ,शंकर लोखंडे,शैलेश चंदनशिवे, लहू कदम,प्रवीण चंदनशिवे,योगेश देवकर,मोहन पवार,विवेकानंद कदम,शरद कदम,वैभव सुर्यवंशी, नागोराव हुडेकर,अविनाश चेंडकाळे, योगीराज सोळशे इ.विक्रेते उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून अप्रमाणित व दुय्यम दर्जाचे बियाणे,रा.खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करणेसाठी,महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (MPDA)कायदा १९८१ या कायद्यासह इतर चार निरनिराळ्या विधयकाद्वारे नवीन कायदे तयार करणेची कार्यवाही सुरू आहे.
राज्यातील विक्रेता कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठा उत्पादन करत नाहीत.सर्व विक्रेते,राज्याच्या कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त कंपन्यांकडून बियाणे,रा.खते व कीटकनाशके सिलबंद पॅकिंग मध्ये खरेदी करून सिलबंद पॅकिंग मध्येच शेतकऱ्यास विक्री करतात,त्यामुळे याबाबतच्या केसेसमध्ये विक्रेत्यांस आरोपी समजणेत येऊ नये,तसेच विक्रेत्याचे ,विक्री केंद्राच्या भागातील शेतकऱ्याचे विश्वासाचे नाते व समाजातील प्रतिष्ठा विचारात घेऊन विक्रेत्यांस महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड(MPDA) कायदा १९८१ खालील तरतुदी विधेयक क्र.४४ तसेच नवीन कायद्यांसंबंधी उर्वरित विधयके क्र.४०,४१,४२,व ४३ मधील तरतुदी विक्रेत्यांसाठी लागु करू नयेत.अशी मागणी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केली आहे.