आमदाराच्या गावात महीलांनी सुरु केले साखळी उपोषण ; पुढाऱ्यांना गाव बंदीचा निर्णय

लोहारा ( जि.धाराशिव ) : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे ते सध्या आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी भातागळी तालुका लोहारा येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय भातागळी च्या समोर उपोषण सुरू केलेले आहे. तसेच महिलांनीच ठराव घेऊन राजकीय नेत्यांना आमदार ,खासदार यांना भातागळी गावामध्ये गाव बंदी करण्यात आलेली आहे.
भातागळी गावातील महिलांनीच पुढाकार घेऊन हे उपोषण सुरू केलेले आहे विशेष म्हणजे भातागळी हे आमदार सतीश चव्हाण साहेब यांचे गाव आहे त्याच गावात महिलांनी ठराव घेऊन आमदार ,खासदार मंत्री राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याने संपूर्ण परिसरात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे.

श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज संध्याकाळी भातागळी गावात कँडल मार्च काढण्यात येणार आहे तसेच उद्या सकाळी सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई हसुरे यांचे मराठा आरक्षण या विषयावर सकाळी दहा वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर उद्या संध्याकाळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यक्तींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.

भातागळी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून स्वतः महिलाही उपोषणास बसले आहेत त्यामुळे हा तालुका भर चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!