मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कॅन्डल मोर्चा, आमरण व साखळी उपोषण

जेवळी (उ) (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील मौजे जेवळी उत्तर येथील सकल मराठा समाजाने श्रीमान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेल्या कांहीं दिवसांपासून लाक्षणिक व साखळी उपोषण चालू करून , सकाळ मराठा समाज ठामपणे पाठीशी असल्याचे निदर्शनास आणून दिले.

दुटप्पी धोरण, वेळ काढूपणा व वारंवार मराठा समाजाची करण्यात आलेली दिशाभूल पाहता राज्य सरकारच्या गलिच्छ कारभाराचा कॅन्डल मार्च मोर्चा काढून निशेष व्यक्त करण्यात आला.

आज रोजी आमरण उपोषण कर्ते प्रकाश लक्ष्मण बिराजदार या मराठा बांधवाने राज्य सरकारचे वाभाडे काढले.दिवसेंदिवस मराठा समाजाच्या आरक्षण बाबतीत राज्य सरकारची चाललेली चालढकल , श्रीमान जरांगे यांची खालावत चाललेली प्रकृती व राज्यभरात आत्महत्या करणारे नवं तरूण या विषयी राज्य सरकार कदापी गंभीर नसून फसवेगिरी कामकाजाचे तिखट शब्दात निःषेध व्यक्त करून , सरकारचे दुटप्पी धोरण राबवत असल्याचा सणसणीत चपराक मारली. आता तरी झोपेचे सोंग घेवून वाटचाल करणाऱ्या सरकारने जागे व्हावे अन्यथा भविष्यातील घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना फक्त आणि फक्त राज्य सरकारच जबाबदार राहील असा सज्जड दम ही भरला.

सदर साखळी उपोषणास सुभाष बिराजदार, संतोष मधुकर बिराजदार, संतोष पाटील ,राहुल सं. बिराजदार, ज्ञानदेव बिराजदार, धनराज बिराजदार ,चेतन शिंदे ,प्रदीप पाटील ,सुनील चव्हाण, माणिक सुरवसे ,दत्तात्रय बिराजदार, पांडुरंग पाटील, रमेश पाटील ,रणवीर पाटील, धोंडीराम नाना सुरवसे, नयन बिराजदार ,गणेश बिराजदार ,सचिन बिराजदार ,बालाजी साळुंखे, आप्पाराव गायकवाड व अनेक मराठा युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!