धीर सोडू नका मी सोबत आहे – उद्धव ठाकरे

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे बांधावर जाऊन पिकांची पहाणी केली. व शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. असा धिर दिला.
यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दाणवे, माजी खा.चंद्रकांत खैरे यांच्या आदी उपस्थित होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे यांचा हा पहीलाच दौरा होता. औरंगाबाद येथील विमान तळावर शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.