शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

धाराशिव : खरीप पिक विमा 2023 संदर्भात केंद्र शासनाचे 30 एप्रिल 2024 चे परिपत्रक रद्द करावे व जुन्या परिपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
6 ऑगस्टपर्यंत हे परिपत्रक रद्द न झाल्यास जिल्ह्यात सात ऑगस्टपासून रस्ता रोको आंदोलनाची ची मालिका तयार केली जाईल.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे श्री जगताप यांनी सांगितले. या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप सिंह भैया पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, माजी नगरसेवक खलील सय्यद सर इत्यादी सह या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

केंद्र शासनाच्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील 32 महसूल मंडळातील शेतकरी हक्काच्या पिकविण्यापासून वंचित राहत असून धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजेलोकसभा आचारसंहितेच्या कालखंडात परिपत्रक काढून पुन्हा एकदा केंद्राने महाराष्ट्र वरचा राग दाखवून दिलेला आहे. सांजा येथील देवस्थानचे जमीन शेतकरी वर्षानुवर्ष करतात त्यांना खंड भरण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी दाखल मंत्रालयातील महसूल विभागातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, थकलेले कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान ,तुषार संच अनुदान सततच्या पावसाचे अनुदान, दुष्काळाचे अनुदान अनुदान इत्यादी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे तसेच रब्बी हंगाम 2023 चा पिक विमा द्यावा, केवायसी प्रक्रिया सुलभ करावी इत्यादी मागण्या हे धरणे आंदोलन करण्यात आले .

या आंदोलनात महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता शेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे आंदोलनाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!