“आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाचे पार्श्वभुमीवर जलद कृती बल व उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचे पथसंचलन”

उस्मानाबाद जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) व बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह बेंबळी गावात पथसंचलन करण्यात आले.
समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने बेंबळी पोलीस स्टेशन अंतर्गत बेंबळी गावातील अक्सा चौक, सास्तुरे चौक, बोरखेडा रोड, बाजार चौक, छ. शिवाजी महाराज चौक, मल्लिकार्जुन मंदिर, मोटे गल्ली, हनुमान चौक, दर्गा मस्जीद असा संपूर्ण बेंबळी गावातील या संवेदनशिल भागात बेंबळी पोलीस स्टेशन व जलद प्रतिसाद पथक सीआरपीएफ 99 बटालियन यांनी संयुक्त रुट मार्च केला व या दरम्याण व्यापारी ,जनतेशी संवाद साधण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, जलद कृती (रॅपीडॅक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट श्री. वीरेंद्र कुमार यादव, कंपनी कमाडंर कृष्ण कुमार चंद्रा, उस्मानाबाद शहर विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. स्वप्नील राठोड, बेंबळी पोलीस ठाण्याचे प्राभारी अधिकारी श्री. योगेश शिंदे, पोउपनि माने व पोस्टे स्टाफ यांचेसह केंद्रीय बलाचे 60 जवान व बेंबळी पोलीस दलाचे 05 अधिकारी व अंमलदार असे सदर पथसंचलनात सहभागी झाले. (सोबत पोलीस पथसंचलनाची छायाचित्रे जोडली आहेत.)