एकल महिला संघटना व विविध संघटनेच्या वतीने लोहारा तहसिलवर निषेध रॅली

लोहारा / अब्बास शेख
मणिपूर राज्यातील आदिवासींवरील हिंसाचार थांबवून कुकी आदिवासी महिला वरील अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी लोहारा तहसीलदार यांना संतप्त महिलांनी मणिपूर राज्यातीलआदिवासी महिला समाजावर झालेल्या अत्याचार प्रकरणी तात्काळ आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी लोहारा तालुका एकल महिला संघटना व विविध सामाजिक महिला संघटनेच्या वतीने लोहारा नायक तहसीलदार सुजाता हंकारे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या दिलेल्या लेखी निवेदनात मणिपूर राज्यातील कुकी आदिवासींना मिळणाऱ्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय लाभावरून बहुसंख्या असलेल्या मैतई या बिगर आदिवासी समाजाने केलेल्या विरोधातून वांशिक संघर्षातून आणि अन्याय त्याच्यातून हजारो आदिवासींच्या घरांची राख रांगोळी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नरसंहार, खून, बलात्कार झाल्याची प्रकरणे पाहायला मिळत आहेत. या सर्व घटना भारतीय लोकशाहीच्या आणि संविधानिक विचारात न बसणाऱ्या आहेत.
मणिपुर राज्यातील कुकी या समाजावरील अन्याय अत्याचार मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून होत आहेत. त्यामध्ये कुकी समाजातील तरुणींची सामूहिकपणे बिगर आदिवासी समाजाने निर्णयपणे धिंड काढून, अमानुषपणे त्यांच्या शरीराशी झोंबा झोंबी करून त्यांच्यावर सामूहिकपणे बलात्कार केलेले आहेत. अत्याचारीत मुलींचे वडील, भाऊ मदतीला आले असता त्यांनाही जिवंतपणे मारून टाकलेले आहे. मणिपूर राज्यातील इंटरनेट सेवा मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने या घटना देशामध्ये समजण्यास उशीर झालेला आहे.
“म्हणून या अमानवी घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.” आणि आम्ही तालुका प्रशासनामार्फत न्याय मागणी करत आहोत.
एकल महिला संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मागण्या
———————————-
1) मणिपूर येथील कुकी, नागा या आदिवासी वरील झालेल्या हल्ल्याची अत्याचार झालेल्या व्यक्तीनिहाय चौकशी करून संबंधित आरोपींना कठोर शासन करण्यात यावे.
2) मणिपूर घटनेतील आदिवासी तरुणींच्या वर अत्याचार केलेल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
3) अत्याचारीत आदिवासी परिवारांचे ताबडतोबिने पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
4) आदिवासींच्या लाभासाठी बिगर आदिवासी समूहांना आदिवासी घोषित करू नये याची केंद्र शासनाने आणि मणिपूर सरकारने दखल घ्यावी.
5) आदिवासी कुकी, नागा यांना त्यांच्या मूळ जागेवरून हुसकावून लावण्याचे षडयंत्र थांबवावे
6) पंतप्रधान, व गृहमंत्री यानी तात्काळ आपले राजीनामे राष्टपती कडे सादर करावे
या मागण्या जिल्हा प्रशासनाने ताबडतोबीने केंद्र सरकारकडे आणि मणिपूर प्रशासनाकडे पाठवून अत्याचारीत आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा
या निवेदनावर एकल महिला संघटनेचे अर्चना पवार
अनुसया नन्नवरे,जनाबाई काळे,जया कांबळे,
महिला प्रतिष्ठानचें जयश्री बिराजदार,संगीता कांबळे, प्रभावती औरादे, काशीबाई जांभळे, विद्या जांभळे, शिवाबाई जांभळे, रत्नाबाई लददे, सुमन गायकवाड, काशीबाई पवार, अनिता जांभळे, मीरा कांबळे, लक्ष्मी कोरे, शालू रसाळ, सुजाता शिवराय, उषा पाटील, सुलोचना वकील, मीना जाधव, सुवर्णा गोरे, राधिका साळुंखे, सोनाली बनसोडे, अनिता पाटील, सुकेसना रसाळ, संगीता कांबळे, हिरकणा वाघमारे, मीराबाई माने, आशा वाघमारे, कौशल्या कांबळे, रत्नाबाई कांबळे, सुरेखा क्षीरसागर, वनमाला लांडगे, दत्तात्रय कांबळे, मिराबाई कांबळे, सह आदीं तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या महिला मोठ्या प्रमाणात या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.