लोहारा शहरातील हरिहर भजनी मंडळाच्या वतीने पायी दिंडी काढत परीसरातील ११ मारुती पाणी घालून पुजा

लोहारा : पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पेरण्या झाल्या असल्यातरी दमदार पाऊस आला नाही. त्यामुळे लोहारा शहरातील हरिहर भजनी मंडळाने शनिवारी २४ जुन रोजी ११ मारुतीला पाणी घालून पुजा करीत पायी दिंडी काढली.शहरातील दोन व परिसरातील माळेगाव, विलासपुर पांढरी,जेवळी, रुद्रवाडी,फणेपुर, वडगाव (गां),वाडीवडगाव, मोघा (बु), मोघा(खुर्द) आदी गावांतील मारुतीला पाणी घालुन पावस पडावा यासाठी पायी चालत दिंडी काढण्यात आली. या दिंडीत बालाजी मक्तेदार,भगवान गरड, सुधाकर बिराजदार,हरी वाघे,सदाशिव बिराजदार, दादाराव माळी,डिगबंर माळी,मधुकर भरारे,सिध्दु निर्मळे, श्रीमंत माळी,गुरुनाथ लामतुरे,शिवन काडगावे, बापु बंगले,भरत बादुले,खंडू माळी, सुभाष पाटील, गजानन माळी, दयानंद सुतार,भैय्या साखरे, आकाश लामतुरे,विशाल बंगले,महेश चपळे,दत्ता सातपुते, ईश्वर लामतुरे,गजू माळी,बंटू माळी यांच्या नागरिक शेतकरी या दिंडीत सहभागी झाले.