काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशमध्ये जंगी स्वागत

बुरहानपुर ( मध्य प्रदेश ) : कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही यात्रा आज बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली. या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे. मध्य प्रदेश मधील बुरहानपुर जिल्ह्यातील बोदरली या गावातून भारत जोडो याञेची सुरवात झाली आहे.
याप्रसंगी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंञी कमलनाथ, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले, विधीमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मध्यप्रदेश कॉग्रेसचे पदधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मध्यप्रदेश काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.