विलासपूर पांढरीत सरपंचपद हे सर्वसाधारण असल्याने मोठी चुरस

सुधीर कोरे
जेवळी ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनल मध्ये एकास एक अशी चुरशीची लढत होत आहे. या सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण असल्याने मोठी चुरस बघायला मिळत आहे.

लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी हे जवळपास अकराशे लोकसंख्येचे गाव आहे. येथे जगदंबा देवीचे मंदिर असून प्रतिवर्षी दसरा – नवरात्र काळात मोठी यात्रा पार पडते. आता येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका जहीर झाल्या आहेत. यापूर्वी गावकरी एकत्र येऊन गावात होणारा मतभेद व पैशाचा चोराडा टाळण्यासाठी सलग वीस वर्ष ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध केल्या होत्या. परंतु आता येथे आपापसातील मतभेद वाढीस लागल्याने २०१७ पासून निवडणुका होत आहेत. यावेळी सरपंच पद हे सर्वसाधारण असल्याने मोठी चुरस निर्माण झाले आहे. सत्ताधारी जगदंबा ग्राम विकास पॅनल विरुद्ध अंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनल मध्ये सरळ एकास एक अशी लढत होत आहे.

येथील ग्रामपंचायत हे सात सदस्य असून एकूण मतदान संख्या ही ८३३ इतकी आहे. जगदंबा ग्राम विकास पॅनलचे एक सदस्य दगडू भिसे हे या पूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. आता सरपंच पदासाठी दोन उमेदवार तर सहा सदस्यासाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी सरपंचासाठी वीरनाथ बाबुराव पाटील विरुद्ध माजी सरपंच मारुती भुजंगराव कार्ले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. तर जगदंबा ग्राम विकास पॅनलचे सदस्य पदासाठी उमेदवार असे- ज्ञानेश्वर (राहुल) खोत, सौ. अशा काशीगावे, बसवेश्वर कार्ले, सौ. प्रेमिला जांभळे, सौ. सरोजा पाटील व सौ. लक्ष्मीबाई जांभळे तर अंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सदस्य पदासाठी उमेदवार- सौ. शोभा बिराजदार, सचिन मुळे, नामदेव औरादे, सौ. पार्वती पाटील, सौ. सावित्रीबाई मुळे, सौ. भाग्यश्री पाटील असे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!