धाराशिव

अमोल बिराजदार यांच्या आमरण उपोषणाला सक्षणाताई सलगर यांचा पाठिंबा

घनकचरा प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी

लोहारा (ता. लोहारा) — शासकीय धान्य गोदामाजवळ व धार्मिक स्थळाच्या शेजारी नगरपंचायत लोहारा यांनी उभारलेला घनकचरा प्रकल्प तत्काळ अन्यत्र हलवावा, नागरिकांच्या आरोग्याची व धार्मिक भावनांची जपणूक व्हावी, या मागणीसाठी श्री. अमोल बिराजदार हे 19 मेपासून लोहारा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, काल (20 मे) राष्ट्रीय युती काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला अध्यक्ष कुमारी सक्षणाताई सलगर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बिराजदार यांना पाठिंबा दिला.

या प्रसंगी कुमारी सलगर यांनी जिल्हाधिकारी श्री. पुजारी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून, घनकचरा प्रकल्प तातडीने इतरत्र हलवण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपोषणकर्त्याच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

उपोषणस्थळी नागरिकांचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर वाढणाऱ्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याप्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!