लोहारा : लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा श्री बालाजी विद्यालय तावशी गड ,येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले .या उद्घाटन प्रसंगी, माननीय भालचंद्र श्रीमंत बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे आयोजक , लोहारा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाना पाटील, पोलीस पाटील श्री माधवराव पाटील ,श्री बालाजी विद्यालयाचे सेक्रेटरी मारुती आंबेकर ,माजी सरपंच राजपाल पाटील,बाबूसिंग राजपूत ,अतुल बिराजदार, यांच्या हस्ते झाले व अकरा वाजता भव्य तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्याकडून निबंध सुरुवात केली या स्पर्धेमध्ये तालुक्यातील 67 विद्यार्थी सहभागी झाले होते व पुढे वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात आली बऱ्याच विद्यार्थ्यांनी 84 वर्षाचा तरुण योद्धा, राजकारणाचा बाप माणूस, शेतकऱ्यांचा कैवारी, माननीय शरद पवार ,यांच्यावर अप्रतिम शब्दांमध्ये वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मंचावरील प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शरद पवार यांच्या जीवनाचा पाढा वाचून दाखवत ते 84 वर्षाचा योद्धा कसा ठरला हे सांगून पुढे सन्माननीय शरद पवार यांना केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि केक कापताच सर्वांनी एकमुखाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विजय असो ……!!!!
अशा घोषणा दिल्या व गावातील नागरिकांचे, ग्रामस्थांचे ,लक्ष वेधून घेतले याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मागील 83 वर्षाचा इतिहास व इतिहासातील राजकारण समाजकारण ,एकता ,बंधुता ,मैत्री ,व देशातील सबंध मंत्री महोदयासोबत घनिष्ठ संबंध ,असल्याचे सांगितले ते म्हणतात की “सत्तेत आल्यानंतर सत्तेत असल्यानंतर कोणी पण जवळ येतो वाढदिवस साजरा करतो” हे सर्व स्वार्थासाठी करतात पण सत्तेत नसतानाही त्यांचा वाढदिवस एवढ्या छोट्या गावात ही त्यांचा सच्चा कार्यकर्ता करतो म्हणजे तोच “खरा एकनिष्ठ कार्यकर्ता “असे म्हणत त्यांनी “भालचंद्र बिराजदार “यांना त्यांनी एक निष्ठेची पाठीवर थाप दिली आणि पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणातील बापमाणूस ,शेतकऱ्यांचा वाली , गोरगरिबांचा कैवारी, भूकंपग्रस्तातील अनेक गावाचा निर्माता ,महाराष्ट्राचा परंतु देशात पहिली राष्ट्रपती राजवट लागू करणारा पहिला मुख्यमंत्री, म्हणून ओळखला जाणारा ,हा जाणता राजा, म्हणजेच शरद पवार….. त्यांच्या विचारांची उंची ही कोणालाच कळणार नाही. त्यांची राजकारण समजण्यासाठी अनेकांचे आयुष्य गेले तरी ते कळले नाहीत म्हणूनच त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आठवणी काढून त्यांना त्यांना पुन्हा एकदा आपण शतक वीर व्हावे असे म्हणत आपले अध्यक्ष संजय काका दुधगावकर पाटील यांनी भाषण संपवले… व धनराज फुरडे यांनीही शरद पवार सांगितले तसेच नियोजन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, कलशेट्टी सर मार्गदर्शन केले.
तावशी गड येथील छायाचित्रकार, समाजकार्य, दैनिक पुण्यनगरी पत्रकारिता यामध्ये रामचंद्र शामराव गायकवाड, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आणि बालाजी विद्यालय तावशी गडच्या मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश चेंडकाळे यांनी केले आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार अतुल भालचंद्र बिराजदार यांनी मानले…
या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट श्री संजय काका दुधगावकर पाटील, तालुका अध्यक्ष नरदेव काका कदम लोहारा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाना पाटील हे लाभले होते .व प्रमुख उपस्थिती येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते मिलिंद नागवशी, सरपंच महेश घोटाळे ,माजी सरपंच सुरेश पाटील, चेअरमन बापूराव बिराजदार , मिटकरी धनराज, माजी सरपंच राम मिटकरी , लक्ष्मण बिराजदार, गोपाळसिंग राजपूत, शांतपा मिटकरी, गावातील तमाम शेतकरी वर्ग
या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस झटणारे आकाश मारेकर,संजय मिटकरी, महेश खुणे, किशोर बिराजदार ,ज्ञानेश्वर दूधभाते ,आबा बिराजदार,आदींनी सहकार्य केले.