गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाच्या प्रवेश द्वाराचे उद्घाटन

जेवळी, ( ता. लोहारा)
जेवळी (ता. लोहारा) येथील गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे नव्याने बनविण्यात आलेल्या सागवानी मुख्य प्रवेशद्वारचे उद्घाटन सोमवारी (ता.२३) मठाधीश मनीप्र श्री गंगाधर महास्वामीजी, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थित पार पडला.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अध्यापही येथे मठ परंपरेला महत्त्व आहे. भूकंपात जेवळी येथे प्राणहानी बरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाले होती. यात येथील बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वस्नानंतर येथील दहा वर्षांपूर्वी परिसरातील भावी भक्तांनी एकत्र येत जवळपास सव्वा कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे.
फणेपूर येथील कै. भागाबाई आप्पाराव माळी- भोजने यांच्या स्मरणार्थ अभियंता राजेंद्र माळी- भोजने यांच्या वतीने नक्षीदार सागवानी मुख्य प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. सोमवारी (ता.२३) या प्रवेशद्वाराचे उद्घाटन पुजा विधी विधानाने मठाधीश मनीप्र श्री गंगाधर महास्वामीजी, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,उपसरपंच बसवराज कारभारी, माजी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, किरण भोजने, बसवराज शास्त्रीय, बुध्दीवंत साखरे, महादेव मोघे, संजय तांबडे, महादेव सारणे, शिवशरण कारभारी, सत्तेश्वर कारभारी, योगिराज सोळशे, राजेंद्र डिग्गे, बंदेनवाज शेख, रोहित कारभारी, शुभम स्वामी, सत्तेश्वर तोरकडे, अप्पासाहेब तांबडे धनराज साखरे, बसवराज स्वामी, जीवन तोरकडे, वैजनाथ हावळे, सागर धरणे, दुधाप्पा कारभारी, स्वप्नील डीग्गे श्रीनाथ बिरादार, मधुकर लोहार, सुधाकर लोहार आदींची उपस्थिती होती.