धाराशिव : अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एस डीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत तातडीने मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तथा विमा अभ्यासक श्री अनिल जगताप यांची मागणी.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना आज दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या तीन चार दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व सततचा पाऊस होऊन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात पिकाचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे त्यामुळे खूप मोठी आर्थिक झळ यावर्षी शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील व सततचा पाऊस झाल्याने शेत जमिनी खरवडून गेल्या असून, उभ्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .अनेक ठिकाणी रस्ते व पूल खचले आहेत पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली असून शेतात सोयाबीनची गंज लावताना वीज पडल्याने कळंब तालुक्यातील तालुक्यातील भाट शिरपुरा येथील एका तरुण शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत धाराशिव जिल्ह्यात आर्थिक व जीवित हानी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे शेती पिकाचे तर कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.
आपण तालुका महसूल प्रशासनाला आदेश देऊन अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत तसेच यापूर्वी संबंधितांना आदेश दिले असल्यास त्याची गती वाढवावी व तातडीने शासनाला प्रस्ताव सादर करून शेतकऱ्यांना एसडीआरएफ एनडीआरएफ अंतर्गत तातडीने मदत द्यावी.
येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाला प्रस्ताव पाठवावा व तातडीने बळीराजांना मदत करावी अशी विनंती अनिल जगताप यांनी केली आहे.
Back to top button
error: Content is protected !!