स्नेहछाया ही मुलांचं आयुष्य घडविण्यासाठी काम करणारी संस्था – श्रीपाल सबनीस

चऱ्होली (पुणे ) : दोन मुलांची आई होणं सोपं आहे. पण पंधरा वीस वंचित व निराधार मुलांची जबाबदारी घेऊन आईपण स्वीकारणं व त्यांचं आयुष्य भोगणं शिवाय साधनालयच्या माध्यमातून पंचवीस मुलींची जबाबदारी घेणं हि साधी गोष्ट नाही. संस्था मोठी नाही तर वंचित मुलांचं आयुष्य मोठं करण्याचं महत्वाचं काम स्नेहछाया हि संस्था करीत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले. दिघीतील स्नेहछायामधील मुलांच्या स्कूल बस उदघाट्न सोहळ्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
पुढे बोलतांना सबनीस म्हणाले की, सरकारी सेवा योजनांचा कुठलाही लाभ न घेता समाजातील तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून संस्था कार्यरत आहे. यावेळी पंचवीस मुलींचे पालकत्व घेतलेल्यांना साधनालय संस्थेच्या नामफलकाचे अनावरण सबनीस दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर कोलते, संस्थेचे आधारस्तंभ संजय गायकवाड, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, मनोज गायकवाड, उषा कोलते, संस्थेचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे, माई सारिका इंगळे, अनिता राकडे, भूषण कडु, सुरेश गायकवाड, कोंडीबा भोर, देवराम कोठारे, ॲड संतोष म्हस्के, अमर राजपूत, शैलेंद्र भालेराव, रविंद्र गायकवाड, स्वप्निल पाटील, दीपक ढमाले, सयाजी कणसे धनाजी जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर कोलते यांनी केले. प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी केले. तर आभार सारिका इंगळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!