लोहारा /उमरगा (जि.धाराशिव ) : बदलापुर येथे झालेल्याा घटनाच्या अनुषंगाने लोहारा शहर व जिल्ह्यातील मुलां मुलींना सुरक्षा मिळवी अशी मागणी निवेदनाव्दारे पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आले असल्याचे माहीती भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका सौ. आरती सतिश गिरी यांनी आयोजित पत्रकार परीषदेत दिली आहे.

लोहारा शहरातील जगदंबा मंदीरात गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका सौ. आरती सतिश गिरी यांनी पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना गिरी म्हणाल्या की, नुकतेच पश्चिम बंगालमध्ये हृदय पिळवून टाकणारी घटना ताजी असतानच बदलापुर मध्ये अतिशय दुखःद व कधी न भरून येणारी घटना घडली ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. परंतु सदर घटनेच्या अनुषंगाने आपणास निश्चितच कांही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत जेणे करून अशा घटनांची पुनरावृत्ती घडणार नाही. माझी एक बहिण, मुलगी, म्हणून विनंती करते की लोहारा शहरातील, तालुक्यातील माझ्या मुलींना, बहिनांना सुरक्षित वातारवणात मुक्त शिक्षण घेता यावे यासाठी प्रत्येक शाळामध्ये पोलीस संरक्षण दयावे. व संबधित संस्थानाही याची दक्षता घेण्यासंदर्भात सुचना देण्यात यावी.

पोलीस अधिक्षक साहेब आपण एक पालक या भावनेतुन सहानुभुतीपुर्वक विचार करुन संबंधित यंत्रणेला आदेश दयावे. किंवा पालक म्हणुन आम्हाला अशा नराधमाची मुडंकी छाटण्याची परवानगी दयावी जेणे करुन छत्रपती शिवाजी महारांजाच्या या राज्यात जसे रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर यांनी केलेल्या गुन्हयासाठी जी शिक्षा दिली ती शिक्षा देण्यासाठी आम्हाला परवानगी दयावी.

शासनाने लाडकी बहिण योजन सुरु केली ती अभिनंदनीय आहेच पण त्या सोबतच माझी लेक, बहिण सुरक्षा योजना राबवावी व लोहारा शहर व तालुकयातील संबंधित पोलीस प्रशासन, शालेय प्रशासन, व इतर संबंधित यांना मुली व महिलांच्या सुरक्षाबाबत कठोर भुमिका घेण्याबाबत आदेशित करण्याची मागणी करत यापुढे हे राज्य श्रीरामाच्या चारित्र्यानुसार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सविधानानुसार चालावे हीच माफक अपेक्षा भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका आरती सतिश गिरी यांनी व्यक्त केली.
Back to top button
error: Content is protected !!