धाराशिव

मुदतीच्या आत पाणीपुरवठ्याचे काम पुर्ण होणार – आमदार ज्ञानराज चौगुले

लोहारा / उमरगा : लोहारा शहराच्या गरजा परीपुर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. यापुढे ही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुदतीच्या आत पाणीपुरवठ्याचे काम पुर्ण होणार असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले आहे.

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माकणी धरणातून लोहारा शहर समांतर पाणीपुरवठा योजना या कामाचे भुमिपूजन माजी खा.रविंद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी माजी खा.रविंद्र गायकवाड हे होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले,युवा सेना मराठवाडी निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, माजी सरपंच नागाण्णा वकील, नगरध्यक्षा वैशाली खराडे, उपनगरध्यक्ष आयुब शेख,माजी सरपंच शंकर जट्टे ,पाणी पुरवठा सभापती शमाब्बी शेख, गटनेत्या सारीका बंगले,नगरसेविक शामल माळी,कमल भरारे, आरती कोरे, आरती गिरी,सुमन रोडगे, संगिता पाटील, सेवानिवृत्त अभियंता राजेंद्र माळी, भिमराव वरनाळे आदींची प्रमुख उपस्थित होते.

 

पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, आम्ही ८०% समाजकारण २०% राजकारण करतो. प्रत्येकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. उमरगा व लोहारा तालुक्यात ९६ हजार लाडक्या बहीण योजनेचा महीलांना लाभ मिळाला आहे. असल्याचे सांगत चौकार तर निश्चितच मारणार असा विश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी प्रताप लोभे, शिवसेना उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे,विजयकुमार ढगे, गौस मोमिन, आरीफ खानापुरे, अविनाश माळी,दिपक रोडगे,ओम कोरे, श्रीकांत भरारे,आयुब शेख, के.डी. पाटील, प्रमोद बंगले,अंकुश नारायणकर,नय्युम सवार यांच्यासह आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिमान खराडे यांनी केले. सुत्रसंचालन बालाजी मक्तेदार यांनी केले. तर आभार गटनेत्या सारीका बंगले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!