केंद्र सरकारने बंद केलेली वार्षिक शिष्यवृत्ती पुन्हा चालु करा – उपनगराध्यक्ष आयुब शेख

मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यीमंत्री महाराष्ट्रन राज्य

 

मार्फत – मा.आ. ज्ञानराजजी चौगुले साहेब उमरगा – लोहारा विधानसभा

विषय :- मुस्लीाम समाजासह इतर अल्पनसंख्यांक समाजातील इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांना केंद्र सरकारने बंद केलेली वार्षिक शिष्यवृत्ती पुन्हा चालु करुन अल्पंसंख्याक कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे बाबत.

महोदय,

वरील विषयी निवेदन करतो की, केंद्र सरकारच्या वतीने अल्पतसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक प्रती 1000/- रु प्रमाणे शिष्य्वृत्ती दिली जात होती. परंतू केंद्र सरकारच्या वतीने सदर शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याखत आली. यामुळे अल्पतसंख्यांक कुटूंबातील प्राथमिक व हायस्कुाल स्तरावर शिक्षण घेणा-या मुलां-मुलींवर अन्याय करणारी आहे.

अल्पंसंख्यांक कुटुंबातील आर्थिक विषमता उत्पन्नाबचे अल्पसाधन नसल्या‍मुळे मुलांमुलींचे शिक्षण पुर्ण करताना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य मुस्ली‍म समाज अल्पषसंख्यांक असुन या कुटूंबाला आर्थिक समस्या. मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. लोहारा तालुका हा मागासलेला असुन भुकंपग्रस्त परिसर आहे. या भागात कुठल्याच सक्षम उत्पन्ना्च्या साधन सामुग्री उपलब्ध नाहीत. अल्पासंख्यांक कुटुंबातील व्यक्तींना दैनंदीन रोजगार उपलब्ध् होत नाही.

    मुस्लीम समाजासह अल्पसंख्याख समाज मागासलेला असुन या मागासलेपणाची नोंद शासनाच्या रेकॉर्डवर नमूद आहे. आपल्या स्तरावरुन केंद्र सरकारकडे या विषयी तातडीने पाठपुरावा करण्यात यावा व अल्पसंख्यांक कुटुंबातील मुला- मुलींना उर्वरित शिष्यवृत्ती चालु करुन अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना आधार व न्याय द्यावा ही नम्र विनंती. असे निवेदन उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी दिले. यावेळी आयुब शेख (टेलर), आमीन सुंबेकर, गौस मोमीन, आरिफ खानापुरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!