खरीप पिक विमा 2022 : राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मंत्रालय मुंबई येथे बैठक संपन्न

राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन त्यातच निकाल जाहीर करणार
उस्मानाबाद : श्री अनिल जगताप यांनी खरीप 2022 बाबत दाखल केलेल्या तक्रार अर्जावरती याचिकेवरती आज मंत्रालय मुंबई येथे तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली यात सर्व मुद्द्यावर चर्चा होऊन लवकरच राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन त्यातच अंतिम निकाल देणार असे अप्परमुख्य सचिव श्री अनुप कुमार यांनी सांगितले.
बैठकीच्या सुरुवातीला श्री जगताप यांनी श्री कैलास घाडगे पाटील यांनी दिलेल्या लक्षवेधी व मंत्री महोदयांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याचे आश्वासित केले होते मात्र तांत्रिक सल्लागार समितीची बैठक कशासाठी असा प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लागलीच अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार यांनी ही केवळ तांत्रिक सल्लागार समितीची बैठक असून पुढील आठवड्यात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन त्यातच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
खरीप 2022 मध्ये जिल्ह्यातील सहा लाख 68 हजार 436 अर्ज शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता जिल्ह्यात अतिवृष्टी पाऊस झाल्याने पाच लाख 89 हजार 2006 शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिल्या होत्या त्यापैकी एक लाख 34 हजार 328 पूर्व सूचना अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोग कालावधी हा एक नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर असून 15 ऑक्टोबर पूर्वी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक दोन लाख 63 हजार 627 पूर्व सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे शंभर टक्के भारांकण लावणे क्रमप्राप्त असताना विमा कंपनीने ते केले नाही.
याविरुद्ध सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीने तसेच विभाग स्तरीय समितीने कंपनीला 100% पीक नुकसान भरपाई द्यावी तसेच पंचनामाच्या प्रति एक महिन्यात उपलब्ध करून देण्यात याव्या तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या एक लाख 34 हजार124 पूर्वसूचना पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावी असे सांगितले होते मात्र कंपनीने ते मानले नाही म्हणून राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आज मुंबई येथे बैठक झाली निकाल राखून ठेवत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक पुढील आठवड्यात घेऊन त्यात अंतिम निकाल दिला जाईल असे आज बैठकीत ठरले.
आज या बैठकीला श्री अनुप कुमार अप्पर मुख्य सचिव तक्रारदार श्री अनिल जगताप कृषी आयुक्त श्री सुनील चव्हाण कृषी सहसचिव सरिता बांदेकर अव्वर सचिव नीता शिंदे कृषी संचालक विनयकुमार आवटे कृषी सहसंचालक लातूर विभाग साहेबराव दिवेकर मुख्य संख्या की कृषी आयुक्त पुणे डी बी पाटील जिल्हा अधीक्षक कृषी श्री माने साहेब विमा कंपनीचे प्रतिनिधी पाटील साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.