जाहीर केल्यानुसार उर्वरित ५०० रुपये प्रमाणे हप्ता न काढण्यास तीव्र आंदोलन

लोहारा (उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द,खेड शिवारातील लोकमंगल माउली साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२०२२ या वर्षीचा बिल हप्ता जाहीर केल्यानुसार उर्वरित ५०० रुपये प्रमाणे हप्ता न काढण्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
तहसिलदार संतोष रुईकर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, लोहारा खुर्द येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदाचा लोकमंगल माउली साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२१-२०२२ या वर्षी गाळपासाठी आमचा ऊस घेऊन गेला आहे. सदरील गाळपाची रक्कम तीन हप्त्यामध्ये २५०० रुपयेप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यायला पाहिजे होते. परंतु एकाच हप्त्यामध्ये २००० रुपये प्रमाणे भाव दिला आहे. परिसरातील दुसऱ्या साखर कारखान्यांनी २५०० रुपये भाव देऊन सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. तरी साखर कारखाना प्रशासनास योग्य तो आदेश देऊन आमची ऊस बिलाची उर्वरित रक्कम मिळवून द्यावी.अन्यथा आमच्या विनंती नुसार व साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने आम्हा सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून भाव जाहीर केल्यानुसार उर्वरित ५०० रुपये प्रमाणे हप्ता न काढल्यास लोकमंगल माउली साखर कारखाना परिसरासमोर परिसरातील सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील महिन्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच सचिन रसाळ, सतिश रसाळ,व्यकंट पाटील,किसन रसाळ,अनिल पाटील,पंढरी मुर्टे,बालाजी इंगळे,सचिन रसाळ, बळीराम रसाळ, प्रभाकर रसाळ, केशव रसाळ, महादेव आरगडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!