लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामधील भूकंपग्रस्त माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

उस्मानाबाद : सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी भारतीय जैन संघटना शैक्षणिक प्रकल्प येथे लातूर व उस्मानाबाद मधील भूकंपग्रस्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा प्रती वर्षाप्रमाणे आशिव ( ता. औसा जि.लातूर ) येथे आयोजित केलेला होता. त्याप्रसंगी दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर,माजी आमदार दिनकर माने,सरपंच गोविंद मदने, उपसरपंच रमेश वळके पाटील, जि प सदस्य राजेंद्र माने,नेताजी गोरे, सुरेश सांळूखे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्यांच्या शुभहस्ते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी मान्यवर अधिकारी व त्यांचे पालक यांचे सत्कार समारंभाचे आयोजन केलेले होते.

त्याप्रसंगी नितीशा जगताप यांच्या वतीने सौ.अश्विनी जगताप व श्री.संजय जगताप यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अभिजीत जगताप कनगरा (पीएसआय) , प्रतीक्षा पिंपरे मासुर्डी (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करत पीएसआय पदी नेमणूक होऊन नाशिक येथे प्रशिक्षण चालू आहे. त्यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय संघटनेचे माजी विद्यार्थी बाबासाहेब कांबळे, माधव माने, बालाजी साठे, गौतम बनसोडे या यशस्वी विद्यार्थ्यांचेही सत्कार करण्यात आले.


आशिव येथील शालेय स्तरावरती दिव्या पवार,कला ॠतुजा पवार.वाणिज्य, वैष्णवी मुळे विज्ञान प्रथम.गणेश कव्हाळे इ10 वी प्रथम स्वप्नाली पाटील, nmms शिष्यवृत्ती पाञ,अपुर्वा गोरे,स्वप्नील पाटील नवोदय साठी निवड झालेले विद्यार्थी या सर्वांचा सत्कार सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, दिनकररावजी माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अनमोल असे मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन यशस्वीतेसाठी पालकाची भूमिका काय असावी या संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. गहिनीनाथ महाराज यांचे आशीर्वचन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या प्रसंगी लाभले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.

स्नेह भोजनानंतर दुपार सत्रामध्ये भारतीय जैन संघटना शैक्षणिक प्रकल्प पुणे या ठिकाणी 1993 पासून कानेगावचे सुपुत्र स्वर्गीय हिंडोळे सर यांचं नुकतंच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आठवणीतील हिंडोळे सर विविध विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव कथन केले.याप्रसंगी संपूर्ण वातावरण भावनिक झाले. पुढील वर्षासाठी सालेगावच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे आयोजन करण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यानुसार सर्वानुमते पुढच्या मेळाव्याची संधी
सालेगावचे माजी विद्यार्थी यांना मान देऊन त्या ठिकाणी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला भारतीय जैन संघटने मधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी त्याच बरोबर सामाजिक कार्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवण्यासाठी सन्माननीय अशोक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेमधून या सर्व गोष्टी घडत आहेत याचा सार्थ अभिमान सर्व भारतीय जैन संघटनेच्या माजी विद्यार्थ्यांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!