लोहारा/प्रतिनिधी
कुणबी मराठा नोंदी असणाऱ्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण सुरु केले होते. याठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले. हा मराठा समाजाचा मोठा विजय असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र सरकारने राजपत्र जारी केले आहे.जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश, ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमेकाला पेढे भरवुन, फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करुन आनंदोत्सव, जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. लोहारा तालुका भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर,तालुका चिटणीस युवराज जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे, गौरव गोसावी, प्रतिक गिरी, कल्याण ढगे, देवपपा भोकरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.