धाराशिव
अतिवृष्टीच्या अनुदानापोटी 221 कोटी 81 लाख रुपये निधी वितरणास मान्यता – जगताप

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना 2024 मधील अतिवृष्टीच्या अनुदानापोटी 221 कोटी 81 लाख रुपये निधी वितरणास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांची माहिती.
गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी ,पूर परिस्थिती झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती शासकीय नियमाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने 8 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण बाधित एक लाख 63 हजार 97 हेक्टर क्षेत्रासाठी 221 कोटी 81 लाख रुपयांची मागणी केली होती राज्य शासनाने दहा डिसेंबर रोजी त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा अनुदान मागणी प्रस्ताव थोडासा उशिराने गेल्याने रखडला होता त्यातच विधानसभेची आचारसंहिता लागल्याने त्याला बराच उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी या संदर्भात मुख्य सचिवांना पत्र देऊन तातडीने दिली वितरित करावी अशी मागणी केली होती त्यानुसार हा निधी आता मंजूर झाला आहे.
उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात मिळेल अतिवृष्टी अनुदान
जिल्हा प्रशासनाने 8 ऑक्टोबर रोजी पहिला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता त्यात धाराशिव कळम वाशी परंडा या चारच तालुक्याचा समावेश होता सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरून वस्तुस्थिती विशद केल्यानंतर तालुका कृषी व महसूल विभागाकडून तातडीने प्रस्ताव मागवण्यात आला होता त्यानुसार लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव 15 ऑक्टोबर रोजी शासनाकडे पाठवलेला आहे. मुख्य सचिव आणि त्याला मान्यता देऊन राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी ठेवला आहे त्यावर निर्णय होऊन पुढील आठवड्यात निधी वितरित होईल अशी माहिती आणि जगताप यांनी दिली. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटी द्वारे थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत. जिरायत क्षेत्रासाठी तेरा हजार 600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित पैसे मिळणार आहेत.
मंजूर झालेले तालुका निहाय मिळणारी अनुदान ,मदत.
धाराशिव तालुक्यातील 65 हजार 633 शेतकऱ्यांना 98 कोटी 47 लाख रुपये मिळणार आहेत तर कळम तालुक्यातील 65331 शेतकऱ्यांना 73 कोटी 45 लाख रुपये मिळणार आहेत तर परंडा तालुक्यातील 14,395 शेतकऱ्यांना 9 कोटी 44 लाख रुपये मिळणार आहे तसेच वाशी तालुक्यातील 35 हजार 57 शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानी पोटी 40 कोटी तीन लाख रुपये मिळणार आहेत व लोहारा तालुक्यातील 370 शेतकऱ्यांना चाळीस लाख 52 हजार आठशे रुपये मिळणार आहेत.
दहा डिसेंबर 24 रोजी महसूल वन विभागाने शासन निर्णय काढून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी 221 कोटी 81 लाख रुपये मंजूर केले आहेत. लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव उशिराने 15 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाकडे गेल्याने त्यावरही पुढील आठवड्यात निर्णय होऊन दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांना पैसे मिळतील कोणीही काळजी करू नये त्यासाठी आपण ताकतीने प्रयत्न करीत आहोत.
अनिल जगताप,सामाजिक कार्यकर्ते, धाराशिव