विमा कंपनीकडून पैसे बँकेत जमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार – याचिकाकर्ते अनिल जगताप

धाराशिव : खरीप 2022 चे 232 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीकडून बँकेत जमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार याचिका करते अनिल जगताप यांची माहिती.

केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के रक्कम दिली होती जिल्हा व विभाग स्तरीय समितीने निकाल देऊन देखील समिती त्या निकालाला जुमानत नव्हती.

राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अनिल जगताप यांनी याचिका दाखल केली 30 ऑगस्ट ला शेतकऱ्याच्या बाजूने ऐतिहासिक निकाल देत 50 टक्के रक्कम, पंचनामाच्या प्रति , बाद केलेल्या एक लाख पंचेचाळीस हजार सूचनाचे फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले व एक महिन्यात शेतकऱ्यांना रक्कम द्यावी असेही राज्य तक्रार निवारण समितीने आदेशित केले.

मात्र भारतीय कृषी विमा कंपनी राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशाला जुमानत नव्हती म्हणून अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आरआरसी कारवाई संदर्भात आग्रह धरला प्रत्यक्षात आर आर सी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर पिक विमा कंपनीने आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटून 25 तारखेपर्यंत पैसे देत असल्याचे सांगितले होते प्रत्यक्षात त्याच्या अगोदरच आज भारतीय कृषी विमा कंपनीने 232 कोटी रुपये बँकेत जमा केली आहे उर्वरित पन्नास कोटी रक्कम राज्य शासनाचा हिस्सा कंपनीला मिळतात शेतकऱ्यांना वाटप होईल त्या रकमेसाठी आपण प्रयत्न करत असून आठवडाभरात तीही रक्कम उपलब्ध होणार आहे. उद्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

मी दाखल केलेल्या याची के वरून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला भारतीय कृषी विमा कंपनी पैसे देत नव्हती म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रहावरून आर आर सी कारवाई केली त्यानंतर कंपनी झुकली आणि आज प्रत्यक्षात कंपनीने 232 कोटी रुपये बँकेत जमा केले असून ते उद्यापासून प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहेत याचा मनातून आनंद वाटत आहे.
अनिल जगताप पिक विमा याचिका करते खरीप 2022

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!