काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले साळुंके कुटुंबीयांचे सांत्वन

लोहारा : (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन तथा उद्योजक कै.शत्रुघन उर्फ आबासाहेब साळुंके यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाल्याने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी त्यांचे मूळ गावी सालेगाव येथे साळुंके कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष दिपक मुळे, उमरगा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ संगीता पाटील,उमरगा नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रमिलाताई टोपगे, माजी चेअरमन बाबासाहेब चव्हाण, सौ मीनाताई देशपांडे, कै.आबासाहेब साळुंखे यांच्या पत्नी श्रीमती ज्योतीताई साळुंके, मुलगा अभय साळुंके , मुलगी कुमारी ऐश्वर्या साळुंके, रोहन साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, मुरली पाटील चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव, मनोज देशपांडे, बाबा देशपांडे, प्रमोद चव्हाण, भीमसेन माने, महादेव घंटे ,श्रीकृष्ण बिराजदार, राम मिटकरी, सचिन देशपांडे, शरद दीक्षित, अण्णाराव देशपांडे, महेश देशपांडे, राहुल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.