उंडरगाव येथे होऊ द्या चर्चा अभियान

लोहारा ( जि.धाराशिव ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे मंगळवारी १० ऑक्टोबर रात्री नऊ वाजता होऊ द्या चर्चा या अभियानातंर्गत बैठक घेण्यात आली आहे.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या फसव्या घोषणा व बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या विषयावर शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील,शिवदुत महेबुब गवंडी,विरपक्ष स्वामी,वैजिनाथ पाटील यांनी भाजप सरकारने नागरीकांची केलेली फसवणुक व पोकळ योजणांचा भांडाफोड केला. व नागरीकांचेही मते जाणुन घेतली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे,शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शिवदूत महेबुब गवंडी,पंडीत बारगळ,शहरप्रमुख सलिम शेख, विरपक्ष स्वामी यांच्यासह आदी उपस्थित होते.