लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण द्या ; लिंगायत महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोहारा / प्रतिनिधी
सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे म्हणून लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे अनेक वर्षापासून झटत आहेत. त्यांनी 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा आडवुन त्यांना आरक्षण देण्यास प्रवृत्त केले होते. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी बोलल्याप्रमाणे आरक्षणाचा निर्णय घेतला.मात्र त्यावेळी सरकारने नेमलेल्या लिंगायत नेते दिलीप सोपल यांनी समाजाची बाजु व्यवस्थीत मांडली नसल्यामुळे वाणी नावाला आरक्षण लागू झाले पण लिंगायत,हिंदु लिंगायत नावाने जातीची नोंद असलेल्या लाखो लिंगायतांना या आराक्षणाचा कसलाच फायदा झाला नाही.ते आरक्षण मिळावे म्हणून जुन्या काळातील नोंदीही तपासल्या गेल्या.परंतू त्या नोंदीही कुठे सापडल्या नाही. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या मुंबईतील बैठकीत प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यांनी एका महिन्यात हा प्रश्न निकाली काढू असे सांगितले आणि आजपर्यंत विसरून गेले.त्यामुळे वाणी नावाला लागु असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे ही मागणी करीत लिंगायत महासंघ लोहारा तालुक्याच्या वतीने दि.३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी लिंगायत महासंघ तालुकाध्यक्ष शंकर अण्णा जट्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक जालिंदर कोकणे,लिंगायत महासंघ जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिपक मुळे,भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष हरी लोखंडे,सरपंच सागर पाटील,काँग्रेस युवक माजी जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हानंद पाटील,बसवराज बिडवे,गणेश खबोले,तमा स्वामी उपस्थित होते.निवेदनावर संजय मिटकरी,सुनील ठेले, प्रशांत लांडगे,शिवमूर्ती मुळे,पवन स्वामी,श्रीनिवास माळी,शरणाप्पा शेकजी,परमेश्वर माशाळकर,उमा होंडराव,मल्लिनाथ बिराजदार,लक्ष्मण भुजबळ, मल्लिनाथ स्वामी,माणिक चिकटे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.