आपण केली पण त्या साडेसात गावात आज साजरी झाली नाही वेळा अमावस्या…

उस्मानाबाद : वेळ अमावस्या हा खरोखरच आनंददायी व ग्रामीण भागाशी निगडित शेती व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण रब्बीचे आलेले भरघोस पीक, तोडणीला आलेला ऊस या सगळ्याच्या सहवासात एक आनंदाचा दिवस मृग नक्षत्रातील खरिप पेरणी पासून सातवी आमवस्या म्हणजे वेळ आमवस्या या अनुषंगाने आज ही उस्मानाबाद,लातूर,सोलापुर जिल्ह्यात शिवार पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या तीन जिह्यात शुक्रवारी वेळ आमवस्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली.
या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो.
यावेळी इडा पिडा टळू दे,बळीचं पाज्य येऊ दे असा घोष करण्यात आला. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पुजा करतो. पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहूण्याच्या जेवणाच्या पंगती बसतात. त्यामुळे रविवारी तालुक्यातील शेतशिवार माणसाने फुलून निघाला. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला.
पांडवाच्या वनवासातील अधिवासातील तसेच कृषी संस्कृतीशी असलेले सप्तसिंधू चे नात लक्षात घेऊन वेळ अमावस्या चे पूजन केले जाते. या पूजावेळी नारळ फोडून नैवेद्य दाखवून रब्बीचे आलेले भरघोस पीक या आनंददायी वातावरण रमण्याचा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
निजाम राजवटीत औसा तालुक्यातील उजनी, अर्ध आशीव तसेच सिमेलगतच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कानेगाव, नागूर, खेड, कास्ती (बु), कास्ती (खु) व भातागळी या गावातील लोकांना निजाम सैन्यानी वेळा अमावस्या च्या पहिल्या दिवशी अटक करून? तुरूंगात टाकले होते.
त्यामुळे वेळा अमावस्याला घरातील पुरुषमंडळी नसल्याने या साडेसात गावात यादिवशी हा सण साजरा झाला नाही. निजाम सैन्याकडून या लोकांची मकरसंक्रांतीच्या दिवशी सुटका झाली. तेव्हापासून हा सण या साडेसात गावात मकरसंक्रांतीला साजरा करण्याची प्रथा पडली ती आजही कायम आहे.