लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील दिनकर किसन माने (वय ६०) हे गावात काही कामधंदा नाही. म्हणून मजुरी करण्यासाठी आपल्या बहीणीच्या गावी औसा तालुक्यातील ताड तावशी येथे गेले होते. गुरुवारी ताड तावशी येथील शेतकरी सुजात देशपांडे यांच्या शेतात कुळव मारत असताना अचानक दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या अवकाळी पाऊसात दुपारी चारच्या सुमारास वीज पडील यात शेतमजुर दिनकर माने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता कानेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परीवार आहे.