नवीन संसद भवनला अनुभव मंडप नाव द्या लिंगायत प्रथम अधिवेशनात ठराव

उमरगा / प्रतिनीधी
सीमावर्ती भागातील बसवकल्याण मध्ये ४ व ५ मार्च रोजी जागतिक लिंगायत धर्मसभा आयोजित प्रथम राष्ट्रीय लिंगायत अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनास महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तेलंगाना, तामिळनाडू, गोवा व दिल्ली यासह विदेशातील नागरिक हजाराच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील २०० पेक्षा जास्त धर्मगुरू उपस्थित होते. सर्वांनी मिळून लिंगायत धर्म मान्यता मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा ठराव संमत करण्यात आला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरुषकट्टा ते थेर मैदान मिरवणूक कडून सुरुवात करण्यात आली.
या अधिवेशनाचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आरळी नागराज यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सांगितलं, अलीकडच्या काळात न्यायव्यवस्था विश्वासहारता गमवत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई न लढता जन आंदोलनाच्या माध्यमातून लिंगायत यांच्या माध्यमातून मागणी मान्य करून घ्यावे. यावेळी अध्यक्षस्थानी धर्मगुरू गो. रु. चन्नाबसप्पा होते.
यावेळी विविध चर्चासत्रामध्ये लिंगायत यांचा इतिहास व भविष्यातील वाटचाली संदर्भात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये जागतिक लिंगायत धर्म महासभेचे डॉ एस एम जामदार, धर्मगुरू मध्ये शरण बसव देवरू, पुज्य गंगाबीका, डॉ बसवलिंग पटदेवरू, कोरूनेश्र्वर स्वामी, संगमबसव स्वामीजी यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सी एस द्वारकानाथ यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं लिंगायत त्यांना अल्पसंख्याक दर्जा मिळाला तरी वर्तमानात असलेल्या आरक्षण जाणार नाही. या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी येणाऱ्या कालखंडात लिंगायतन सोबत असून संघर्षासाठी सदैव साथ राहील हे सांगितले.
या प्रसंगी अधिवेशनात ठराव घेण्यात आले दिल्लीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या संसद भवन असा अनुभव मंडप हे नाव द्यावे, केंद्र सरकारने देशभर राष्ट्रीय पातळीवर बसव जयंती साजरी करावी, लिंगायतास अल्पसंख्याक मान्यता द्यावी विविध बारा मागण्यांचा ठराव घेण्यात आला.यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष डॉ एस एम जामदार, जिल्हाध्यक्ष बसवराज धनुर, जगदीश पाटील, जे एस पाटील, बसवराज तोंडारे, जगदीश खूबा, राजेंद्र जुनिकेरी, राजेंद्र कुमार गणगे, बसवराज बालकिल्ले, सिद्धया कावडीमठ, महाराष्ट्रचे राजशेखर तंबाके, नरसिंग मुळे, गुंडप्पा चौगुले, देवराज संगुलगे कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.