लातूर – किल्लारी – गुलबर्गा रेल्वे मार्गास स्वीकृती द्या – खासदार ओमराजे निंबाळकर

किल्लारी प्रतिनिधी :- प्रशांत नेटके

लातुर-औसा एमआयडिसी- लामजना- किल्लारी -नारंगवाडी- उमरगा एमआयडिसी- मार्गे गुलबर्गा या सरळ रेल्वेमार्गाला मंजुरी मिळणे बाबतच्या किल्लारी व परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री भारत सरकार अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे.

लातुर-औसा एमआयडिसी-लामजना- किल्लारी -नारंगवाडी- उमरगा एमआयडिसी- मार्गे गुलबर्गा या सरळ रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षापासुनची मागणी  आहे. निजाम काळात तसा सर्वेही झालेला होता. लातुर- किल्लारी- गुलबर्गा हा १४८ किलो मीटरचा सरळ मार्ग आहे. या मार्गाचा सर्वे करण्यासाठी मागिल पाच वर्षांपूर्वी २२ लाख २० हजार रुपये मंजूर केले होते. रेल्वेच्या बुक मध्ये तशी नोंद पण आहे.
लातूर गुलबर्गा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा येथूनच सरळ गेलेला आहे. या मार्गे मोठ्याप्रमाणावर दळणवळण, प्रवासी वाहतूक आहे.  या मार्गावर केवळ दोनच नद्या येत असल्याने पुनर्बांधणी खर्च कमी येईल.

यामुळे रेल्वे राहील फायद्यात…..
या सरळमार्गी औसा एमआयडीसी, उमरगा एमआयडीसी, किल्लारी, बेलकुंड व भाऊसाहेब साखर कारखाने, मालवाहतूक, मालावर प्रक्रिया उद्योग, सोयाबीन उद्योग, शेकडो फळबाग उद्योग, द्राक्ष उत्पादक शेतकरी यामुळे रेल्वे नियमित फायद्यात राहील.

पूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा होऊ शकेल वापर ? ….
उमरगा ते औसा या राष्ट्रीय महामार्गाला प्यारलल मार्ग असून या मार्गाचा स्वातंत्र्य काळात रेल्वेसाठी सर्वे करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. आज हा मार्ग वाहतुकीसाठी खुला नाही. या मार्गावर केवळ नदीवरील पुल बांधकाम बाकी आहे. हा निर्मनुष्य मार्ग जुने किल्लारी गाव, तळणी मार्गे जातो. येथून खर्च कमी, व्हिजीबिलीटी चांगली, या सरळमार्गे भूसंपादन कमी, रेल्वेमार्ग निर्मिती खर्च कमी असल्यामुळे या मार्गाचा निजाम कालीन सर्वे झाला होता.

या मार्गावरील उद्योजक, व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक, प्रवाशी यांची मोठी सोय होणार आहे. या कामी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रभारी सरपंच युवराज गायकवाड, शिवसेनेचे किशोर जाधव, ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे खासदारांनी या मार्गासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचे औसा, उमरगा, लोहारा तालुक्यातील प्रवासी, ग्रामस्थातून कौतुक होत आहे.

लातुर- किल्लारी -नारंगवाडी- उमरगा एम आय डि सी-  मार्गे गुलबर्गा या सरळ रेल्वेमार्गाच्या सर्वेसाठी निधी मंजूर झाला होता. भूकंपग्रस्त गावातून कृती समिती स्थापन करून नारंगवाडी ( ता. उमरगा ) येथे चक्काजाम आंदोलन केलो होतो.
प्रकाश सुभेदार, पेटसांगवी. जिल्हा धाराशिव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!