संविधान बचाव परिषदेचे अशोकराजे सरवदे यांनी केला नुतन सरपंचाचा सत्कार

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील बळी बापू रणखांब यांच्यानेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास व सामाजीक पॅनल परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले त्याबद्दल संविधान बचाव परिषदेचे तथा लहू शक्तीचे नेते अशोकराजे सरवदे यांनी ग्रामपंचायत तोरंबा येथे जाऊन त्यांचा निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा सत्कार केला यावेळी पहिल्यांदाच सरपंचपदी निवड झालेले यादव हनुमंत चव्हाण व पॅनल प्रमुख बळी बापू रणखांब यांच्यासह विक्रम विनायक चव्हाण, रवींद्र बाबुराव रणखांब, मधुकर युवराज कांबळे, तानाजी बळीराम रणखांब, उज्वला श्रीधर दुनगे, अनिता धोंडीराम चव्हाण, आशा रणधीर दूधभाते, सोनाली नेताजी चव्हाण, रूपाली दत्ता रणखांब, आधी सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला हे पॅनल पहिल्यांदाच बहुमताने निवडून आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावेळी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.