समता संदेश महापद यात्रेचे कासार बालकुंदा मध्ये उत्स्फूर्त स्वागत

उमरगा / प्रतिनिधी
बसववादी शरणांचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेण्यासाठी लिंगायत सेवा संघ यांच्या वतीने शुक्रवारी रोजी कासार बालकुंदा ग्रामस्थांनी उत्साहाने वाजत गाजत फटाक्यांचे आतिष बाजीने (दि.२८) समता संदेश बसव महापदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व आजी-माजी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
नेतृत्व कोरणेश्वर स्वामीजी (विरक्त मठ, उस्तुरी), संगनबसव स्वामीजी (विरक्त मठ,निलंगा) यांचे प्रवचन झाले. यावेळी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी लोकशाहीचा पाया रचला व अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. वेगवेगळ्या जातीसमुहातील सातशे सत्तर शरणांना सोबत घेऊन जातीअंताचा लढा उभारला. समाजाला समतेची व श्रमप्रतिष्ठेची शिकवण दिली.
संगनबसव स्वामीजी म्हणाले, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी मानवी कल्याणाचा मार्ग दाखविला. आपण जीवनात धर्म आणि कर्म कस कमावावे. त्या मार्गाने आपण वाटचाल करण्याची खरी गरज आहे . कल्याण हे भूमी क्रांती भूमी आहे. श्री महात्मा बसवेश्वर यांनी सांगितलेले सामाजिक समतेचे विचार आजही उपयोगी पडत आहेत, असे प्रतिपादन कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले.