किल्लारी ,लामजना सह परिसरात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरी

किल्लारी / प्रशांत नेटके

शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत शुक्रवारी काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून असंख्य शेतकरी कुटुंबानी वेळ अमावस्या उत्साहात साजरी केली.

कृषी संस्कृतीची साक्ष जागवणारा वेळ अमावस्या हा सण आज उस्मानाबाद , लातूर व कर्नाटकच्या काही भागात मोठ्या उत्साहात साजरा होतो. जगाला पोसणाऱ्या काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी आज च्या दिवशी काळ्याआईची मनोभावे पूजा करून आपल्या शेतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो . सध्या शेतात गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, व करडईचे पीक बहरात आलेले असते, बोर व शेंगा हा रानमेवा ही खाण्याजोगा झालेला आहे.या बहरलेल्या शेतात शेतकरी कडबा अथवा गवताची खोप बनवतो.

पांडवांची प्रतिष्ठापना करतात या पांडवांना चुना व शेंदूर लावला जातो. हळद कुंकू यांनी पूजा केली जाते.या पूजेनंतर शेतामध्ये शेत चर शिंपला जातो या वेळी हर हर महादेव या नामाचा जयघोष केला जातो तसेच,जेवणाचा फक्कड बेत असतो. वरण,आमटी, भज्जी,आंबील,खीर, शेंगदाण्याच्या पोळ्या असे पदार्थ असतात यामध्ये असतात. आंबील हे विशेष पेय व सर्व भाज्यांपासून बनवलेली भज्जी ( भाजी) हे जेवणाचं खास वैशिष्ट्य असते.

याचा स्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात नातेवाईक मित्र व शेतकामाला मदत करणाऱ्या 12 बलुतेदारांना जीवनासाठी आमंत्रण केले जाते. वेळा अमावस्याच्या दिवशी जवळपास सर्वजण रानभोजनचा आनंद लुटण्यासाठी शेतात जातात . त्यामुळे गाव व शहरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो.

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात हा सण साजरा होतो

मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद मध्ये ही वेळा अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

ग्रामीण भागातील वेग वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे काही गावात मकसंक्रांतीच्या दिवशी असा जेवणाचा बेत आखला जातो

                 जेवणाचे खास वैशिष्ट्य 

⛔ आंबील – आंबील हे गाई आणि म्हशीच्या ‘ताकापासून’ बनवले जाते ताकात शिजवून ज्वारीचे पीठ, लसणाच्या पातीची पासून बनवलेले पेस्ट, कोथिंबीर पेस्ट चवीपुरते मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून आंबिल बनवली जाते.

⛔ भज्जी – भजी म्हणजे सर्व पाणी भाज्यांपासून बनवलेली भाजी असते. यात गाजर, टोमॅटो, बोरे, वांगी, बटाटे, घेवड्याच्या, शेंगा, कांद्याची पात, हिरवी मिरची, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी तयार केली जाते याला भज्जी असे म्हणतात .

⛔ उंडे – बाजरीच्या पिठापासून उंडे बनवले जातात बाजरीच्या दळलेल्या पिठलं पाण्यात एकत्र केल्या जातात त्याचे छोटे छोटे गोळे केले जातात आणि याला शिजवल जाते हे उंडे आंबील सोबत व दुधासोबत खाल्ले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!