धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करीत आहे. तर शहरी भागातील रस्ते मोठमोठे उड्डाण पूल बांधण्याचे काम उद्योजकांना कामे देऊन त्यांच्याकडून पक्ष निधी घेत आहे. मात्र विकास करण्याच्या नावाखाली ग्रामीण भागाला विकास करण्याचे धोरण आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी मतदान करताना सतर्कता बाळगून हुकुमशही सत्ता उलथवून भाजपला सत्तेतून पायउतार करावे असे आवाहन माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी दि.२७ एप्रिल रोजी केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवाजी सरडे,रवि कोरे आळणीकर,अँड संजय भोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना माजी खासदार कांबळे म्हणाले की, भाजपने अच्छे दिनची व्याख्या तरी सांगावी केवळ भूलथापा मारायच्या व अबकी बार चार सौ पार जागा मिळतील या भ्रमात रहायचे असे उद्योग भाजपने सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे भाजपने गुन्हेगारी कायद्यामध्ये प्रचंड बदल केले असून एखाद्यावर एफ आय आर दाखल झाला तर कमीत कमी तीन महिने त्याला जेलमध्ये टाकण्याची तरतूद केली असल्यामुळे या सरकारची राजकीय हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचे भाजपचे धोरण नसून ते शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी कधीही बलवान होऊ द्यायचा नाही. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकारला जनतेला मतदान मागण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे काँग्रेसची बॅंक खाती गोठवून टाकून काँग्रेसला धुळे पांगळे केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेना फोडली असून अशाच पद्धतीचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून प्रबळ विरोधी पक्ष ठेवला नसल्याचा आरोप करीत मतदारांनी सतर्कता बाळगली तर लोकशाही वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी मतदारांना खूश करून उद्योगपतींना कामे देऊन त्यांच्याकडून पैसे मिळवून इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसे घ्यायचा हा दुसरा मनी लॉन्ड्रींग असून यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केलेले आहेत. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची सुनावणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील सुविधेकडे अजिबात लक्ष नसल्याचे सांगत हे सरकार पुन्हा सत्तेवर न येण्यासाठी मतदारांनी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेचे इलेक्शन संपले की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला व शिंदे यांच्या शिवसेनेला हाकलून देत भाजप विधानसभेच्या २८८ जागा भाजप लढणार असून या दोन्ही पक्षाला हाकलून देणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी दिला.