महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अविनाश ठाकरे यांची निवड

पुणे : ( प्रतिनिधी )
पंधराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ओबीसी महा मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी
साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
खानवडी ता पुरंदर येथे होणा-या साहित्य संमेलनाच्या
निमंत्रक पदी गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड शिवाजी कोलते आहेत. संमेलनाध्यक्ष अविनाश ठाकरे हे माजी अधक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ (राज्यमंत्री दर्जा),माजी सत्तारूढ पक्ष नेता मनपा नागपूर, माजी अधक्ष स्थायी समीती मनपा नागपूर, विश्वस्त अखील भारतीय महानुभाव परीषद,राष्ट्रीय अध्यक्ष माळी महासंघ आदी पदे भूषविले आहेत.सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे नागपूर शहरात महानगरपालिका क्षेत्रात काम करीत आहेत. संमेलनाचे उदघाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरुंगे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२,३० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ ३० वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर डॉ अरुण कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, योगिता कोकरे, डाँ जगदीश शेवते, गणेश फरताळे सहभागी होणार आहेत. कवयित्री स्वाती बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा. चव्हाण, प्रा. गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तात्रय भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!