असे तहसीलदार लोहारा तालुक्यास पुन्हा लाभणार नाहीत

 लोहारा ( जि.धाराशिव ) : तहसीलदार लोहारा श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या बदलीने अधिकारी कर्मचार्‍यांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुका पूर्वी मा. तहसीलदार लोहारा हे अणदुर ता.तुळजापूर जि.धाराशिव येथील रहिवाशी असल्याने त्यांची जिल्हा बाह्य बदली करण्यात आली आहे.
श्री.प्रसाद कुलकर्णी यांचा ५ ते ६ महिणाचा होता. परंतु या अल्प कार्यकाळामध्ये तालुक्यातील अनेक वर्षा पर्यंतची प्रलंबित प्रकरणे निकाली काडली.जनतेचे.शेतकर्‍यांच्या बांधाचे.रस्त्याचे. अर्थसहाय्य योजना लाभार्थ्यांचे.भुकंपग्रस्त लाभार्थींचे प्रश्न मार्गी लावले.
तालुक्यातला कोणताही राजकीय .सामाजिक पुढारी/ कार्यकर्ता नागरिक विद्यार्थी पिडित. अशा लोकांशी सकारात्मकतेने संवाद साधने.व त्यांच्या अडचणीवर कायदेशीर तोडगा सांगुन समाधान करणे हि त्यांची खुबी अनेकांची मने जिंकली आहेत. वरिष्ठा येणारे मोहिम.राष्ट्रीय सण .जयंत्या यामध्ये हिरहिरीने सभाग नोंदवुन उत्तम पद्धतीने पार पाडणे.
मराठा आरक्षण संदर्भात रात्रंदिवस सर्व सुपरवायझर प्रगनक यांच्याकडून कामे करून घेऊन शासनाला तातडीने अहवाल सादर केला असल्यामुळे त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडून मोठे कौतुक करण्यात आले होते.श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी कधीही अधिकारी असल्याचा धाक न दाखविता सर्व सहकार्यासोबत मित्र स्नेहाचे नाते जपल्यामुळे
तहसील कार्यालयातील कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी सुध्दा प्रसाद कुलकर्णी आपल्याला सोडून जात असल्याचे नाराजी व्यक्त करत आहेत.

भागवत गायकवाड, तहसिल कार्यालय,लोहारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!